Claim–
लाॅकडाऊन मध्ये अडकलेल्या मजुरांसाठी विशेष जनसाधारण रेल्वेगाड्या सुरु होणार.
मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाच्या बातमीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 14 एप्रिल रोजी सकाळी दाखवण्यात आलेल्या या बातमीचा हा व्हिडिओ असून यात देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी प्रत्येक विभागातून विशेष जनसाधारण रेल्वे सुरु करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
Verification
आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली असता आम्हाला ट्विटरनर प्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे यांचे ट्विट आढळून आले. यात त्यांनी एबीपी माझाची बातमी गोंधळ निर्माण करणारी तसेच अर्ध सत्य असल्याचे म्हटले आहे.
एबीपी माझाच्या बातमीत काय म्हटले आहे ?
ही बातमी बारकाईने पाहिली असता पत्रकार माहिती देतात की, “रेल्वे विभागातील सूत्राकडून मिळालेल्या पत्रानुसार व्हिडिओ काॅन्फरन्स द्वारे रेल्वे बोर्डातील आणि डिव्हिजनमधील मंडळी रेल्वे मंत्र्यांशी संपर्क साधत आहेत. तसेच काल (13 एप्रिल) वेगवेगळ्या डिव्हिजन बरोबर व्हिडिओ काॅन्फरन्स झाली. आणि त्यानंतर काल संध्याकाळी हे पत्र इश्यू करण्यात आले आहे. प्रत्येक डिव्हिजनला त्या त्या डिव्हिजनमध्ये किती मजूर अडकले आहेत याचा डेटा देण्यात आला आहे. आणि ह्या मजुरांना त्यांच्या त्यांच्या गावाकडे पाठवण्यासाठी जनसाधारण विशेष ट्रेन्स सुरु करायच्या आहेत त्याचे तपशील पण गेलेले आहेत. याता दुसरा अर्थ असा की, एकीकडे पंतप्रधानांनी आज जर लाॅकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला तर त्याबरोबरच वेगवेगळ्या शहरामंध्ये जे अडकून पडलेले मजूर आहेत, त्या मजुरांना शहराच्या बाहेर काढण्याच्या दृष्टीने सुद्धा एक वेगळा प्लॅन बनलेला आहे. सोबत माझ्याकडे काही डिटेल्स पण आहेत ज्यामध्ये ग्रीन सेक्टरमधील काही रेल्वे सेवा जर सुरु करायच्या असतील तर त्या सुरु करण्याच्या संदर्भात काय काय गोष्टी कराव्या लागतील याचे पण तपशील देण्यात आलेले आहेत, 55 पेक्षा जास्त वय असणा-या रेल्वेतील कर्मचा-यांना यांनी तसेच मर्यादीत काळासाठी रेल्वे सुरु झाल्या तर टीसी ने काय काम करायचे आहे याचीही माहिती देण्यात आली आहे”.
आम्ही याबाबत बाबत शोध घेतला असता एबीपी माझाच्या वेबसाईटवर देखील ही बातमी आढळून आली.
बातमीत महाराष्ट्रातील कोणत्या विभागातून रेल्वेगाड्या धावणार आहेत याचाही उल्लेख केला आहे.
बातमीत शेअर करण्यात आलेले पत्र बारकाईने पाहिले असता ते दक्षिण-मध्य रेल्वेचे विभागाचे असल्याचे दिसून येते. पण ती प्रेस रिलीज नसून रेल्वे विभागातील अंतर्गत चर्चेतील प्रस्तावाचे पत्र असल्याचे समोर आले. शिवाय यात महाराष्ट्रातील मध्य रेल्वे विभागाचा देखील उल्लेख नाही. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तसेच दक्षिण-मध्य रेल्वेचे ट्विट आढळून आले. या ट्विटमध्ये स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, काही विभागामंध्ये स्थलांतरित कामगारांसाठी विशेष गाड्या चालविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता मात्र याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. विशेष गाड्या चालवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, 3 मे 2020 पर्यंत सर्व प्रवासी रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलला देशातील जनतेला संबोधित केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने देखील प्रवासी सेवा 3 मे पर्यंत रद्द करण्यात आल्याची तसेच कोणतीही विशेष रेल्वे गाडी चालवली जाणार नसल्याची माहिती ट्विटर वर दिली आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की रेल्वे विभागातील अंतर्गत प्रस्तावाचे पत्र चुकीच्या दाव्याने बातमीत वापरण्यात आले आहे. रेलवे मंत्रालयाने 3 मे 2020 पर्यंत कोणतीही विशेष रेल्वे गाडी सुरु करणार नसल्याचे म्हटले आहे.
Source
Twitter Advanced Search
Google Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)