Thursday, April 25, 2024
Thursday, April 25, 2024

HomeFact Checkरावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी जिवंत आहेत, व्हायरल झाली निॆधनाची अफवा

रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी जिवंत आहेत, व्हायरल झाली निॆधनाची अफवा

Authors

रामायण मालिकेत रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी यांचे निधन 

दुरदर्शनवरील रामायण मालिकेत रावणाची भूमिका करणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले असा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपल्या कलेने रावणाचे पात्र पडद्यावर जिवंत करणारे कलाकार अरविंद त्रिवेदी यांचे निधन ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो.


Verification- आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली. गूगलमध्ये काही किवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला असता फेसबुक अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाच्या काही पोस्ट आढळून आल्या.

https://www.facebook.com/kumari.dharmendra/posts/1482027031971910

सोशल मीडियामध्ये अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाच्या पोस्ट व्हायरल झाल्या असल्या तरी मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये अशी कोणतीही बातमी आढळून आली नाही. त्यामुळे आम्ही अनेक वर्षांपासून बाॅलीवुड कव्हर करणा-या एका ज्येष्ठ पत्रकाराशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. ते सुखरुप आहेत. शिवाय आम्हाला दिव्य मराठी या वृत्तपत्राच्या वेबसाईटवर देखील त्यांच्या निधनची अफवा असल्याची बातमी आढळून आली. 

याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी काही किवर्डसच्या आधारे आम्ही शोध घेतला. यासाठी इनव्हिड टुलच्या मदत घेतली असता अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांचे ट्विट आढळून आले. यात त्यांनी म्हटले आहे की, त्यांचे काका लंकेश अरविंद त्रिवेदी स्वस्थ आणि सुरक्षित आहेत. खोटी बातमी पसरवणे बंद करावे. आपण खाली ट्विट पाहू शकता.

यावरुन हेच स्पष्ट होते की, अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाल्याची अफवा सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. त्यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी फेक न्यूज न पसवरण्याचे आवाहन देखील केले आहे. 
Source 
Sharechat, Facebook, Google Search 
Result- Fabricated news/false content

(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular