Friday, April 19, 2024
Friday, April 19, 2024

HomeFact CheckPoliticsकेंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शेतकरीविरोधी विधान केल्याचा दावा व्हायरल, जाणून घ्या...

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शेतकरीविरोधी विधान केल्याचा दावा व्हायरल, जाणून घ्या सत्य

Authors

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शेतकरीविरोधी विधान केले असल्याची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये एका बातमीचे कात्रण शेअर करण्यात आले आहे. शेतक-यांना मरायचे असेल तर मरु द्या… शेतक-यांसाठी कितीही करा… त्याला कमीच वाटते… दर दिवसाला कोणी न कोणी शेतकरी आत्महत्या करतो, सरकार प्रत्येकाकडे लक्ष देत फिरेल का? शेती संबंधी एका कार्यक्रमात बोलताना संजय धोत्रे यांनी असे विधान केले असल्याचे या बातमीत म्हटले आहे.

Fact Check/Verification

केंद्रीय राज्यमंत्री व अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी खरंच असे विधान केले आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला फेसबुकवर ही बातमी मागील काही महिन्यांपासून व्हायरल होत असल्याचे आढळून आले.

https://www.facebook.com/photo?fbid=689419371545696

संग्रहित

https://www.facebook.com/photo?fbid=1163292927391119
https://www.facebook.com/photo?fbid=1121542668205478

व्हायरल बातमी कधीची आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र आम्हाला सध्या दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलना दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी असे वक्तव्य केल्याची बातमी कुठेही आढळून आली. नाही यानंतर आम्ही काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला डिसेंबर 2014 मध्ये एनडीटीव्हीच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेली बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, शेतक-यांच्या आत्महत्यामुळे नेते देखील हताश झाले आहेत. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी देखील एका कृषिविषयी कार्यक्रमात हताश होऊन म्हटले की, “एकीकडे पारंपारिक शेती तर दुसरीकडे बीटी बियाण्यांचे महत्व शेतक-यांना सांगितले जात आहे.. या मिश्रित माहितीमुळे शेतकरी देखील असे हुरळून गेले आहेत, जंस अनेक डाॅक्टरांच्या सल्लाने रुग्ण हुरळून जातो. 35 वर्षांपासून ही द्विधावस्था आहे, इतर काही माहिती नाही… श्रीमंत शेतक-यांची ही अवस्था आहे तर मग गरीब शेतक-यांचे काय हाल असतील… तसं पाहिलं तर शेतकरी कमी माहिती मिळवतात… मला तर वाटते आपली धोरणे हेच शेतक-यांचे मोठे संकट आहे… मी तर रागाने हे देखील म्हणतो… शेतकरी सजग नाहीत, त्यांना मरु द्या… ज्यांना शेती करायची आहे, ते करतील… जे व्हायचे आहे ते होईल…”

अधिक शोध घेतला असता आम्हाला टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या बातमीचा व्हिडिओ युट्यूबवर आढळून आला. यात संजय धोत्रे कृषि कार्यक्रमात बोलताना दिसत आहेत. बातमीत धोत्रे यांची प्रतिक्रिया दाखवण्यात आली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. मी शेतक-यांचा मुलगा आहे. मी अनेक शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला आहे. मी शेतक-यांच्या विदारकतेवर हताश होऊन हे वक्तव्य केले होते.

Conclusion

यावरुन स्पष्ट होते की, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सध्याच्या शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकरी विरोधी वक्तव्य केले नाही. 2014 मध्ये त्यांनी शेतकरी सजग नसल्याने हताशपणे वक्तव्य केले होते, ते चुकीच्या दाव्याने व्हायरल झाले होते.

Our Sources

एनडीटीव्ही- https://khabar.ndtv.com/news/india/leaders-are-despondent-akola-mp-says-let-farmers-die-719618

टाईम्स नाऊ- https://www.youtube.com/watch?v=6GyuMmntfS4

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.


Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular