Thursday, April 25, 2024
Thursday, April 25, 2024

HomeMarathiइंद्रायणी एक्सप्रेसमध्ये नाही घड़ली बॅग हिसकावल्याची घटना, चुकीच्या दाव्याने व्हिडिओ व्हायरल

इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये नाही घड़ली बॅग हिसकावल्याची घटना, चुकीच्या दाव्याने व्हिडिओ व्हायरल

Authors

Claim

पुणे मुंबई इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये महिलेच्या हातातून बॅग हिसकावली. घटना ट्रेनमधील सीसीटीवी कॅम-यात कैद झाली.

Verification
सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक महिला आणि ज्येष्ठ नागरिक ट्रेनच्या दरवाज्यात उभे असताना ट्रेनचा स्पीड कमी होताच एक चोर दरवाजात उभी असलेल्या महिलेच्या हातातीतल बॅग हिसकावून झटकन उतरुन जातो. महिला त्याच्यामागे धावताना तिच्या मागे उभे असलेले प्रवासी तिला तोल जाऊ नये म्हणून रोखतात. हा प्रकार पुणे-मुंबई इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये मुंब्रा टनेल जवळ घडला असल्याचे सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. 
आम्ही याबाबत शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये अशी घटना घडल्याची बातमी आढळली नाही. यानंतर आम्ही रेल्वेकडून याबाबत काही स्पष्टिकरण दिले आहे का याबाबत शोध घेतला असता आम्हाला रेल्वेचे एक टविट आढळून आले. 
रेल्वेने याबाबत माहिती देताना काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. 

1. इंद्रायणी एक्सप्रेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविलेले नाहीत.  

2. व्हायरल व्हिडिओतील कोचचे इंटेरियर इंद्रायणीच्या कोचशी मिळते जुळते नाही. 

3. सीसीटीव्हीमध्ये जी वेळ दाखवली जात आहे ती 22. 40 मिनिटे आहे. त्या तारखेला ट्रेन 21.30 मिनिटांनी ठाण्यात पोहचली होती. 

4. पारसिक टनेलमध्ये एवढ्या कमी गतीने इंद्रायणी ट्रेन जात नाही. 

5. या बोगद्यात एवढा गॅप नाही. 

6. लुटारने कानटोपी आणि स्वेटर घातला होता. मुंबईत असे हवामान त्या दिवशी नव्हते.

7. जीआरपी किंवा आरपीएफ कडे अशा प्रकारची कोणतीही तक्रार आलेली नाही. 

यावरुन हे स्पष्ट होते की, ही घटना पुणे मुंबई इंद्रायणी एक्सप्रेमधील नाही. याबाबत प्रशासनाने खुलासा केला आहे. ही नेमकी कुठली आहे याचा शोध सुरु आहे.
Sources 
  •  Twitter Advanced Search 
  •  Facebook Search 
  •  Google Search 
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular