Thursday, April 18, 2024
Thursday, April 18, 2024

HomeCoronavirusजिल्हाधिका-यांच्या नावाने मॅसेज पुन्हा व्हायरल, जाणून घ्या सत्य

जिल्हाधिका-यांच्या नावाने मॅसेज पुन्हा व्हायरल, जाणून घ्या सत्य

Authors

कोरोना व्हायरस संदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिका-यांच्या नावाने मॅसेज व्हायरल झाला आहे. यात कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत. वृत्तपत्रे बंद करा, फळे भाजीपाला घरी आणल्यावर नीट धुउन घ्या, चिकन मटन खाणे बंद करा अशा अनेक सूचना करण्यात आल्या आहेत.

संग्रहित

Fact Check/Verification

जिल्हाधिका-यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या या मॅसेजचे सत्य काय आहे याची पडताळणी करण्याचे आम्ही ठरविले. यासाठी काही किवर्ड्सच्या सहाय्याने शोध घेतला पण अशी कोणतीही बातमी आढळून आली नाही. मात्र अधिक शोध घेतला असता आम्हाला 22 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध झालेली नाशिक दैनिक लोकमतची बातमी आढळून आली. या बातमीनुसार नाशिकच्या जिल्हा प्रशासनाने हे’ व्हायरल मॅसेज च्यांनी दिले नसल्याचे म्हटले आहे. बातमीत हा मॅसेज इतर जिल्ह्यांच्या जिल्हाधिका-यांच्या नावाने व्हायरल झाल्याचे म्हटले आहे.

पोस्टमधील काही दावे खरे असले तरी तरी काही दाव्यांमध्ये तथ्य नाही जसं की, मांसाहार टाळावा. दाव्यात ‘चिकन मटण’ बंद असं अगदी सुरुवातीलाच सांगितले आहे. FSSI ने मात्र मांसाहार करण्यास धोका नसल्याचे तसेच याने कोरोनाचा प्रसार होत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच वृत्तपत्रांमुळे कोरोना पसरतो हा दावा देखील खोटा असल्याचे आढळून आले आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि तज्ज्ञ डाॅक्टरांच्या मते वृत्तपत्रे सुरक्षित आहेत. यापासून कोरोनाचा प्रसार होत नाही.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की, वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिका-यांच्या नावाने व्हायरल झालेला मॅसेज खोटा आहे. सोशल मीडियात पुणे, नांदेड, नाशिक, नंदुरबार या जिल्हाधिका-यांच्या नावाने याआधीही हा मॅसेज व्हायरल झाला होता.

Result- False

Sources

लोकमत- https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_HNSG_20200923_2_3

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.


Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular