दावा- लाॅकडाऊन संपल्यानंतर गुन्ह्यांमध्ये वाढ होणार असल्याचा संदेश पोलिसांनी दिला आहे.
सोशल मीडियात मुंबई पोलिसांच्या नावाने एक संदेश व्हायरल झाला आहे. यात सामान्य नागरिकांना सावधान करताना म्हटले आहे की, टाळेंबदी संपल्यानंतर बेरोजगारी वाढल्याने आणि व्यवसाय बंद झाल्याने चोरी लुटमार, आणि अपहरणाच्या गुन्ह्यांत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्य नागरिकांनी महागड्या वस्तू किंवा सोन्याच्या वस्तू जवळ बाळगू नयेत. त्यांनी आपले सामान, सोन्याचे दागिने, मोबाईल, याबाबतीत सावध राहिले पाहिजे तसेच लहान मुले आणि मोठ्यांनी सुद्धा अधिक काळजी घेतली पाहिजे. या दिवसांत लोकांची कमाई बंद झाल्याने बेरोजगारी वाढलेली असणार आहे त्यामुळे व्यापारावर देखील विपरीत परिणाम होणार आहे यामुळे अपहरण आणि चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ होऊ शकते.
पडताळणी– आम्ही या संदर्भात पडताळणी करण्यास सुरुवात केली. गूगलमध्ये काही किवर्डसच्या मदतीने शोध घेतला असता एका इंग्रजी वेबसाईटवर बातमी आढळून आली. यात मुबई पोलिसांच्या नावाने असलेल्या संदेशात 22 मुद्द्यांच्या माध्यमातून टाळेबंदी संपल्यानंतर संभाव्य परिस्थिती काय असेल याची माहिती देण्यात आली आहे.
याशिवाय हा मॅसेज व्हाटस्अॅप्प वर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आम्हाला आढळून आले.
आम्ही या संदर्भात पुढे शोध सुरुच ठेवला असता हा संदेश बंगलुुरु पोलिसांच्या नावाने देखील व्हायरल झाल्याचे समोर आले.
व्हायरल संदेशाच्या बाबतीत अतिरिक्त आयुक्त मुंबई पोलिस (गुन्हे) संदीप कर्णिक यांनी व्हायरल संदेश मुंबई पोलिसांनी दिलेला नाही अशी माहिती दिली आहे. शिवाय आम्हाला याच व्हायरल संदेशाच्या बाबतीतील बंगलुरु पोलिसांचे देखील एक ट्विट आढळले त्यांनी देखील ही माहिती बंगलुरु पोलिसांनी दिली नसल्याचे यात स्पष्ट केले आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की, लाॅकडाऊन संपल्यानंतर गुन्ह्यांत वाढ होणार असल्याचा संदेश मुंबई किंवा बंगलुरु पोलिसांनी दिलेला नाही. ही एक सोशल मीडियात पसरवलेली अफवा आहे.
Source
Twitter, Whatsapp,Google Search
Result-Fabricated News/ False content
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)