Friday, March 29, 2024
Friday, March 29, 2024

HomeFact Checkशेतक-यांसाठी प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सुरु केलेली नाही, हे आहे सत्य

शेतक-यांसाठी प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सुरु केलेली नाही, हे आहे सत्य

Authors

केंद्र सरकारने शेतक-यांसाठी प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सुरु करण्यात आल्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या विकासासाठी मोदी सरकार सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे. नव-नवीन योजना शेतकऱ्यांसाठी राबवत आहे. आता मोदी सरकारने धमाकेदार योजना आणली असून यामुळे प्रत्येक शेतकरी ट्रॅक्टरचा मालक होणार आहे. हो मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना आणली असून या योजनेतेर्गंत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळणार आहे.

संग्रहित

Fact Check / Verification

केंद्र सरकारने शेतक-यांसाठी खरंच अशी योजना सुरु केली आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. असता आम्हाला अॅग्रो स्टार नावाच्या वेबसाईटवर ही बातमी तीन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाल्याचे आढळून आले.

याशिवाय आणखी एक फेसबुक पोस्ट आढळून आली ज्यात या योजनेविषयी माहिती देण्यात आली आहे.

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=114125570400485&id=108841927595516

याबाबत अधिक शोध घेतला असता आम्हाला agrowonegram या वेबसाईटवर याच योजनेसंदर्भात बातमी आढळून आली मात्र यात म्हटले आहे की, पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेची बातमी खोटी आहे. प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही शेतक-यांनी त्या बातमीवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन कृषी आयुक्तालाने केल्याचे म्हटले आहे.

आम्ही अधिक शोध सुरु ठेवला असता, आम्हाला आणखी एक फेसबुक पोस्ट आढळून आली. ज्यात लोकमतच्या बातमीचे कात्रण शेअर केले आहे. बातमीत प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना अस्तित्वात नसल्याचे कृषी विभागने स्पष्टिकरण दिल्याचे म्हटले आहे.

https://www.facebook.com/KuchikR/photos/a.279859132199122/1526205090897847/

याशिवाय आम्हाला पत्र व सूचना विभागाचे ट्टिट देखील आढळून आले. यात केंद्र सरकारने शेतक-यांसाठी अशी योजना सुरु कॆली नसल्याचे म्हटले आहे.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, केंद्र सरकारने शेतक-यांसाठी प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सुरु केलेली नाही. सोशल मीडियात खोट्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.

Result : False

Our Sources

PIB- https://twitter.com/PIBFactCheck/status/1294608052717383680

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular