Friday, April 26, 2024
Friday, April 26, 2024

HomeFact CheckT20 उपांत्य फेरीतील पराभवानंतर विराट कोहलीने संन्यास घेतल्याचा खोटा दावा होतोय व्हायरल

T20 उपांत्य फेरीतील पराभवानंतर विराट कोहलीने संन्यास घेतल्याचा खोटा दावा होतोय व्हायरल

Claim

टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील इंग्लंडविरुद्धच्या मानहानीकारक पराभवानंतर,भारतीय फलंदाज विराट कोहलीने निवृत्ती अर्थात क्रिकेट सन्यास घेतल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेच्या व्हिडिओद्वारे हा दावा करण्यात आला आहे.

Courtesy: Facebook/Top Trend

Fact Check

विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत करण्यात येत असलेला हा दावा पूर्णपणे खोटा आहे.आतापर्यंत कोहलीने निवृत्ती जाहीर केल्याची कोणतीही बातमी आलेली नाही.जर हे खरोखर घडले असते तर ती एक मोठी बातमी ठरली असती आणि आतापर्यंत मीडियामध्ये कव्हर झाली असती.

तसेच विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेचा हा दावा करत असलेला व्हिडिओ 2 महिन्यांपूर्वी झालेल्या आशिया कप 2022 चा आहे.विराट या व्हिडिओमध्ये कुठेही म्हणत नाही की तो निवृत्त होणार आहे.

याशिवाय,वृत्तानुसार,काल म्हणजेच 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या उपांत्य फेरीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना काही वरिष्ठ खेळाडूंच्या भविष्याबद्दल विचारण्यात आले.रोहित शर्मा,विराट कोहली,अश्विन,भुवनेश्वर कुमार यांचे टी-२० क्रिकेटमधील भविष्य काय असेल,हा प्रश्न होता.यावर राहुल द्रविडने यावेळी याबाबत बोलणे घाईचे असल्याचे उत्तर दिले होते.

एकंदरीत विराट कोहलीचा निवृत्तीचा दावा खोटा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.दोन महिने जुन्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर संभ्रम निर्माण केला जात आहे.

Result:False

तुम्हाला ही वस्तुस्थिती तपासणी आवडली असेल आणि तुम्हाला अशा आणखी तथ्य तपासण्या वाचायच्या असतील तर येथे क्लिक करा.


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी,दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा:9999499044 किंवा ई-मेल करा:checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular