Thursday, March 28, 2024
Thursday, March 28, 2024

HomeFact CheckViralलष्कराने पीओकेत 'पिन पॉईंट स्ट्राइक' केलेली नाही, माध्यमांत चुकीची बातमी प्रसिद्ध

लष्कराने पीओकेत ‘पिन पॉईंट स्ट्राइक’ केलेली नाही, माध्यमांत चुकीची बातमी प्रसिद्ध

Authors

भारतीय लष्कराने पीओकेत ‘पिनपॉईंट स्ट्राइक’ केली असल्याच्या बातम्या माध्यमांत प्रसिद्ध झाल्या आहेत. पीटीआयचा हवाला देत प्रसिद्ध झालेल्या या बातमीत म्हटले आहे की, भारतीय सैन्याने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये आतंकवाद्यांचे लॉन्चिंग पॅड उद्वस्त केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांविरूद्ध कठोर कारवाई करून भारतीय लष्कराने ही मोठी कारवाई केली आहे. पीओकेमध्ये भारताने ‘पिन पॉईंट स्ट्राइक’ केली आहे. या संदर्भात झी 24 तास या वेबसाईटवर ही बातमी प्रसिद्ध झाली आहे.

संग्रहित

न्यूज 18 लोकमत ने देखील या बाबत वृत्त दिले आहे.

संग्रहित

कृषीवल दैनिकाच्या वेबसाईटवर देखील भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्यो पिन पाॅईंट स्ट्राईक केल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे.

संग्रहित

Fact Check/Verification

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली आहे का याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला एनएनआय या वृत्तसंस्थेचे ट्विट आढळून आले यात म्हटले आहे की, आज (19 नोव्हेंबर 2020) एलओसी ओलांडून कोणतीही गोळीबार झालेला नाही, असे भारतीय सैन्याने स्पष्ट केले.

संग्रहित

दी हिंदू या इंग्रजी दैनिकाचे डिफेन्स प्रतिनिधी दिनकर पेरी यांनी देखील ट्विट करुन म्हटले आहे-, सैन्याने स्पष्टीकरण दिले आहे की पीटीआयची स्टोरी 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या सीझफायर उल्लंघन (सीएफव्ही) च्या विश्लेषणावर आधारित आहे. आज एलओसीवर गोळीबार किंवा सीएफव्ही झाला नाही.

संग्रहित

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की, भारतीय लष्काराने 19 नोव्हेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पिन पाॅईंट स्ट्राईक केलेली नाही. माध्यमांत चुकीची बातमी प्रसिद्ध झाली आहे.

Result- False

Our Sources

एएनआय- https://twitter.com/ANI/status/1329422315088617472

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular