Friday, April 19, 2024
Friday, April 19, 2024

HomeFact CheckViralगृह मंत्रालयाने 31 डिसेंबरपर्यंत देशातील शाळा, काॅलेज बंद ठेवण्याचा आदेश दिलेला नाही,...

गृह मंत्रालयाने 31 डिसेंबरपर्यंत देशातील शाळा, काॅलेज बंद ठेवण्याचा आदेश दिलेला नाही, चुकीचा दावा व्हायरल

Authors

गृह मंत्रालयाने 31 डिसेंबरपर्यंत देशातील शाळा, काॅलेज बंद ठेवण्याचा आदेश दिला असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात म्हटले आहे की, गृहमंत्रालयाने मोेठा निर्णय घेतला असून देशभरातील शाळा आणि काॅलेजेस 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत.

फेसबुक/ संग्रहित

https://www.facebook.com/photo?fbid=1068762933575907
https://www.facebook.com/photo?fbid=672662130081239

Fact Check/Verification

गृहमंत्रालयाने 31 डिसेंबरपर्यंत देशभरातील शाळा बंद ठेवण्याचा आदेश जारी केल्याची आहे का याची आम्ही पडताळणी सुरु केली परतुं आम्हाला याबाबत कोणतीही बातमी आढळून आली नाही. यानंतर आम्ही गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जारी केलेल्या सर्व आदेशांची तपासणी केली मात्र शाळा, काॅलेज बंद करण्याशी संबंधित कोणताही आदेश आढळला नाही.

गृह सचिव अजय भल्ला यांनी 27 आॅक्टोबर रोजी सर्व राज्यांच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिले होते. यामध्ये सर्व राज्यांमधील सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत परंतु या पत्रात शाळा, काॅलेज बंद करण्याचा उल्लेखही नाही.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ट्विटर हॅंडलवर देखील आम्हाला शाळा, काॅलेज बंद करण्यासंदर्भात कोणतेही अपडेट मिळाले नाहीत.

अधिक शोध घेतला असता आम्हाला पीआयबीने या संदर्भात फॅक्ट चेकिंग केल्याचे ट्विट आढळून आले. यात म्हटले आहे की, व्हायरल दावा खोटा आहे. गृह मंत्रालयाने शाळा, काॅलेज 31 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिलेला नाही.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की, गृहमंत्रालयाने 31 डिसेंबरपर्यंत देशातील शाळा, काॅलेज बंद ठेवण्याचा आदेश दिलेला नाही, सोशल मीडियात खोटा दावा व्हायरल झाला आहे.

Result- False

Our Sources

PIB- https://twitter.com/PIBFactCheck/status/1330900036436123648

MHA- https://www.mha.gov.in/media/whats-new

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.


Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular