Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी चार हजार किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास योजना सुरु केल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यासाठी जवळच्या आगारात स्मार्ट कार्ड बनवून मिळत असल्याचे म्हटले आहे.
पोस्टमध्ये काय म्हटले आहे?
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) यांच्या वतीने 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत 4000 किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास करता येणार आहे. त्याकरता महामंडळाकडून स्मार्ट कार्ड प्राप्त करणे आवश्यक आहे. आपले आधारकार्ड, मतदान कार्ड किंवा मतदान स्लीप आणि 55 रुपये घेऊन आपल्या जवळच्या एसटी डेपोत जावे लागले. जाताना स्वताचा मोबाईल नेण्यास विसरु नये. वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. काही भागात ही वेळ वेगळी असू शकते. ही माहिती 65 वर्षावरील आपले आप्त, सहकारी मित्रांना कळवा.

एसटी ने खरंच ज्येष्ठ नागरिकांसाठी चार हजार किलोमीटर पर्यंत मोफत प्रवासाची योजना सुरु केली आहे का याची पडताळणी सुरु केली असता आम्हाला mymahanagar या वेबसाईटवर 26 जून 2019 रोजी प्रसिद्ध झालेली एक बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, कल्याण आगाराचे वाहतूक नियंत्रक प्रकाश शिनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट कार्डची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्याला आधार कार्डशी लिंक करण्यात येणार असून त्यानंतर 10 ते 15 दिवसात जेष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ आगारातर्फे यादी जाहीर करून देण्यात येत आहे. या स्मार्ट कार्डमुळे ज्येष्ठ नागरिकांनी कुठे आणि किती किलोमीटरचा प्रवास केला? याची सविस्तर माहिती एका क्लिकवर महामंडळाकडे उपलब्ध होण्यास मदत होईल. यापूर्वी ज्येष्ठांसाठी अर्ध्या तिकीटाच्या दरावर 4 हजार किलोमीटर प्रवासाचीच मर्यादा होती. मात्र, केवळ मतदान कार्ड, आधार कार्ड पाहून प्रवाशांना तिकिटे दिली जात असल्याने कोणत्या प्रवाशाने किती प्रवास केला, याची माहिती महामंडळाला मिळवता येत नव्हती, मात्र या नवीन कार्डमुळे ते शक्य होणार आहे.

या बातमीत कुठेही ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत योजना लागू करणात आल्याचे म्हटलेले नाही. त्यामुळे ाम्ही अधिक शोध घेतला असता एसटीच्या सवलतीसाठी लागमारे स्मार्ट कार्ड बनवून घेण्यास 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे महामडंळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सांगितल्याची बातमी आढळून आली, मात्र या बातमीतही ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार असल्याचा उल्लेख नाही.

यानंतर आम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वेबसाईटला दिली असता तेथे महामंडाळाकडून दिल्या जाणा-या सवलतींची माहिती आढळून यात ज्येष्ठ नागरिकांना 4000 कि.मी.पर्यंत एकत्रित (साधी,निमआराम,शिवशाही (आसनी व शयनयान) या बसेसमध्ये प्रवास करण्यासाठी 50 टक्के सवलत देण्यात आल्याचे म्हटले आहे.

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, राज्य परिवहन महामंडळाकडून 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत नाही तर 50 टक्के सवलतीत 4000 किलोमीटर प्रवास करता येतो.
MYMAHANGAR
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.