Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतक-यांना 701 कोटींची मदत जाहीर केली आहे. नुकतेच राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांत पुराच्या पाण्यामुळे लाखों लोकांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी पूरग्रस्त भागाची पाहणी करुन मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. यानंतर केंद्र सरकारने देखील 700 कोटींची मदत नुकसानग्रस्त शेतक-यांना देण्याचे जाहीर केल्याच्या बातम्या माध्यमांत प्रसिद्ध झाल्या.
याबबात न्यूज 18 लोकमत ने वृत्त दिले असून यात म्हटले आहे की, केंद्र पूरग्रस्त शेतक-यांना दिलासा दिला असून 700 कोटीची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्यातील पूरग्रस्त शेतक-यांच्या मदतीसाठी 700 कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले आहे.
याशिवाय हॅलो महाराष्ट्र नावाच्या न्यूज वेबसाईटवर देखील राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे अतोनात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 700 कोटींची मदत जाहीर केल्याचे म्हटले आहे.
याशिवाय फेसबुकवरील काही पोस्टमध्ये केंद्र सरकारने राज्यातील पूरग्रस्त शेतक-यांना 700 कोटींची मदत जाहीर केल्याचे म्हटले आहे.
Fact Check / Verification
न्यूज 18 लोकमत आणि हॅलो महाराष्ट्रच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलेल्या पुरग्रस्त शेतक-यांनी 700 कोटींच्या मदतीच्या बातमीवरील कमेंट्स मध्ये ही मदत या वर्षीची नूसन मागील वर्षीची म्हणजेच 2020 मध्ये पुराने नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी देणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही मदत यावर्षी म्हणजेच जुलै 2021 मधील पूरग्रस्त शेतकर-यासाठी आहे की मागील वर्षी नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला मॅक्स महाराष्ट्र या वेबसाईटवर याबाबत बातमी प्रसिद्ध झाल्याचे आढळले.
यात म्हटले आहे की,जून – ऑक्टोबर 2020 मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुराचा सर्वाधिक फटका हा राज्यातील शेतकऱ्यांना बसला होता. अनेक ठिकाणी पुराने पीकं आणि शेतातील माती देखील खरडून गेली होती. त्यामुळे शेतीचं मोठ नुकसान झालं होत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे भरघोस मदत करण्याची मागणी केली होती. राज्याकडून केंद्राकडे 3 हजार 700 कोटींची मागणी करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून राज्यातील जून-ऑक्टोबर 2020 मधील पुरबाधित शेतकऱ्यांसाठी केवळ 701 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
याशिवाय दैनिक प्रभातच्या वेबसाईटवरील बातमीत देखील 700 कोटीची मदत ही मागील वर्षीच्या पुरग्रस्तांसाठी असल्याचे म्हटले आहे.
दैनिक लोकसत्ताची बातमी देखील आढळून आली या बातमीत देखील ही मदत जून ते आॅक्टोबर 2020 दरम्यान पूरबाधित शेतक-यांना देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे शिवाय बातमीत राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी आता कोकण व इतर जिल्ह्यांत अतिवृष्टीने शेतकर-यांचे अतोनात नुकसान झाले आहे केंद्र सरकारने सढळ हस्ते मदत करावी अशी मागणी केल्याचा उल्लेख देखील बातमीत करण्यात आला आहे.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, केंद्र सरकारने राज्यातील पुरग्रस्त शेतक-यांना 701 कोटींची मदत जाहीर केली आहे पण ही मदत मागील वर्षाच्या पुरबाधित शेतक-यांसाठीची आहे. सध्याच्या पुरात नुकसान झालेल्या शेतक-यांना मदतीची घोषणा अजून झालेली नाही.
दैनिक प्रभात- https://www.dainikprabhat.com/701-crore-flood-affected-farmers-maharashtra-help-last-years-victims/
मॅक्स महाराष्ट्र- https://www.maxmaharashtra.com/news-update/center-announces-rs-700-crore-for-flood-victims-in-the-state-964724
लोकसत्ता- https://epaper.loksatta.com/c/62100278
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा
Vasudha Beri
November 21, 2024
Prasad S Prabhu
August 30, 2024
Prasad S Prabhu
August 7, 2024