Thursday, March 28, 2024
Thursday, March 28, 2024

HomeMarathiगायक कैलाश खेर यांना आयआयटी कानपूरने नोटीस पाठवली ? जाणून घ्या व्हायरल...

गायक कैलाश खेर यांना आयआयटी कानपूरने नोटीस पाठवली ? जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य 

Authors

Claim

गायक कैलाश खेर यांना आयआयटी कानपूरने अल्ला के बंदे या गाण्यामुळे नोटीस पाठवली. या गाण्यात फक्त मुस्लिमांनाच हसण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Verification- 
सध्या सोशल मीडियात सुफी गायक कैलाश खेर यांच्याविषयी काही पोस्ट व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे कि कानपुर आयआयटी ने कैलाश खेर यांना नोटीस पाठवली आहे. खेर यांनी आपल्या अल्लाह के बंदे या गाण्यामध्ये फक्त मुस्लिमांनाच हसण्याचे आवाहन केल्याचा आरोप या नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
आम्हाला  असा दावा असणारे काही ट्विट्स ट्विटरवर आढळून आले.
याशिवाय फेसबुकवर देखील याच दाव्याच्या पोस्ट आढळून आल्या.
याबाबत आम्ही कैलाश खेर यांना आयआयटी कानपूर कडून खरंच नोटीस आली का याबाबत शोध घेण्याचा प्रयत्न केला. गूगल मध्ये काही किवर्ड्सच्या मदतीने शोध घेतला पण आम्हाला कैलाश खेर यांच्याविषयीच्या अनेक बातम्या आढळून आल्या मात्र हा व्हायरल दावा असलेली कोणतीही बातमी आढळून आली नाही
कैलाश खेर हे विशिष्ट धर्मासाठी गाणी गातात असा त्यांच्यावर ठपका ठेवता येत नाही हे खालील बातमीवरुन दिसून येते.

ऋषिकेश पहुंचे कैलाश खेर, बोले- गंगातट की वजह से मेरे जीवन में आया संगीत

परमार्थ निकेतन के परमाध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती, साध्वी भगवती सरस्वती और प्रसिद्ध सूफी गायक कैलाश खेर ने ‘स्वयं का सबसे अच्छा संस्करण’ बनाना कार्यक्रम में प्रतिभाग किया। इस दौरान सूफी गायक कैलाश खेर ने कहा कि उनके जीवन में जो संगीत आया है उसमें गंगा के तट ऋषिकेश का बहुत

यावरुन हेच स्पष्ट होते की कोणत्याही प्रतिष्ठित माध्यमांत किंवा वर्तमानपत्रात कैलाश खेर यांना आयआयटी ने नोटीस पाठवल्याची बातमी आलेली नाही. त्यामुळे व्हायरल पोस्टमधील दावा हा खोटा आहे.
Tools Used 
Google Keyword Search
Facebook Search
Twitter Advanced Search
Result- Fake 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular