Friday, March 29, 2024
Friday, March 29, 2024

HomeMarathiमुकेश अंबानींनी राम मंदिर निर्मितीसाठी यूपीच्या मुख्यमंत्र्यांना दिले नाहीत 500 कोटी, जुनाच...

मुकेश अंबानींनी राम मंदिर निर्मितीसाठी यूपीच्या मुख्यमंत्र्यांना दिले नाहीत 500 कोटी, जुनाच फोटो झाला व्हायरल

Authors

Claim-
अंबानी परिवाराने राम मंदिर निर्मितीसाठी 500 कोटी रुपये दिले. 
Verification
ग्रेट महाराणा प्रताप नावाच्या ट्विटर हॅंडलवर मुकेश अंबानी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक फोटो शेअऱ करण्यात आला आहे. या टविटमध्ये अंबानी परिवाराने राम मंदिर निर्मितीसाठी 500 कोटी दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
व्हायरल टविटची पडताळणी करत असताना आम्हाला हाच दावा करणारे आणखी एक टविट आढळून आले.
याशिवाय फेसबुक वर देखील असाच दावा करणा-या अनेक पोस्ट आढळून आल्या.
आम्ही या पोस्ट्समधून शेअर करण्यात आलेला अंबानी आणि योगी आदित्याथ यांचा फोटो गूगल रिव्हर्स इमेजच्या मदतीने शोधला असता या फोटोचे सत्य समोर आले. हा फोटो दोन वर्षापूर्वींचा आहे. योगी आणि अंबानींची त्यावेळी मुंबईत भेट झाली होती. दोघांमध्ये यूपीत गुंतवणुकीबद्दल चर्चा झाली होती याची बातमी दैनिक जागरण सह इतर माध्यमांतही प्रसिद्ध झाली होती.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्यावेळी या भेटी संदर्भात ट्विट केले होते.
यावरुन हे स्पष्ट झाले की हा फोटो अयोध्या निकलानंतरचा नाही तर दोन वर्षापूर्वीचा आहे. आम्ही काही किवर्ड्सच्या आधारे याविषयीची काही माहिती मिळतेय का यासाठी गूगलमध्ये शोध घेतला असता मनी भास्कर या वेबसाइटवर राम मंदिर निर्मितीसंबंधीची बातमी आढळून आली. या बातमीनुसार राम मंदिर निर्मितीसाठी 100 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे म्हटले आहे. पण या बातमीत कुठेही अंबानी मदत केल्याचा किंवा करणार असल्याचा उल्लेख नाही.
यातून हेच स्पष्ट होते की राम मंदिर निर्मितीसाठी मुकेश अंबानींनी निधी दिला नाही किंवा तशी कोणतीही घोषणा केलेली नाही. सोशल मिडियात राम मंदिर निर्मिती संदर्भात असेच अनेक भ्रामक दावे व्हायरल होत आहेत.
Tools Used 
  • Twitter Advanced Search
  • Facebook Search
  • Google Keyword Search
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular