Claim-
नीरव मोदी ने भारतातून फरार होण्यासाठी काॅंग्रेसच्या नेत्यांना 465 कोटींचे कमिशन दिले होते. पीएनबीच्या 13500 कोटींच्या घोटाळ्यात त्याचा फक्त 32 टक्केच वाटा होता, बाकीचा काॅंग्रेस नेत्यांचा आहे.
Verification
Dharmendra Singh नावाच्या ट्विटर हॅंडलवर पंजाब नॅशनल बॅंकेचा 13500 कोटींचा घोटाळा करुन भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी विषयी एक ट्विट करण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे कि लंडनच्या कोर्टात नीरव मोदीने सांगितले आहे कि तो भारतातून फरार झालेला नाही तर काॅंग्रेसच्या नेत्यांनी त्याला धमकावून देश सोडण्यास भाग पाडले तसेच यासाठी त्याने नेत्यांना 465 रुपयांचे कमिशन देखील दिले आहे. शिवाय एकूण घोटाळ्याच्या 13500 कोटींच्या रकमेपैकी त्याचा वाटा फक्त 32 टक्के आहे बाकीचा काॅंग्रेस नेत्यांचा आहे.
आमच्या एका वाचकाने अशाच प्रकारता दावा असणारा एक Whatsapp मॅसेज पडताळणीसाठी आमच्याकडे पाठवला आहे.
नीरव मोदीच्या व्हायरल पोस्ट बद्दल आम्ही पडताळणी सुरू केली. गुगलमध्ये काही किवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला याबाबात काही रिझल्ट आढळून आले नाहीत. यानंतर काही हिंदी किवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता एनडीटीव्हीची एक वर्षापुर्वीची बातमी आढळून आली. या बातमीनुसार भाजपाचा मित्र पक्ष शिवसेनेने नीरव मोदी देशातून फरार होण्यासाठी भाजपा जबाबदार असल्याचे म्हटले आहे. शिवसेनने नीरव मोदी निवडणुकीच्या काळात भाजपासाठी पैसे जमा करण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील केला आहे.
नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बॅंकेच्या 13500 कोटींच्या घोटाळ्यांचा मास्टरमाईंड मानला जातो. ट्विटमध्ये केलेल्या दाव्यानुसार या घोटाळ्यात त्याचा फक्त 32 टक्के हिस्सा आहे बाकीचा कांग्रेस नेत्यांच्या आहे. या दाव्याची आम्ही पडताळणी केली असता अशा प्रकारची कोणतीही बातमी वा माहिती आम्हाला मिळाली नाही.
आमच्याकडे पडताळणीसाठी पाठविलेल्या Whatsapp मॅसेजमध्ये नीरव मोदी आणि काॅंग्रेसचे नेते अभिषेक मनु सिॆघवी यांच्यात संबंध असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. आम्ही या ही दाव्याची पडताळणी सुरू केली असता आज तक या हिंदी वाहिन्याची वेबसाईटवर एक बातमी मिळाली। या बातमीनुसार सिंघवी यांनी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर पलटवार करत अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले होते. सिंघवी यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात विनाकारण त्यांचे नाव गोवत आहे मी त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करु शकतो.
तसेच त्यांनी सांगितले की, गितांजली किंवा नीरव मोदीच्या कंपनीशी त्यांचा, पत्नीचा किंवा मुलाचा काही संबंधन नाही. सिंघवी यांनी सांगितले की कमला मिल्सच्या परळ येथील त्यांच्या एका प्राॅपर्टीमध्ये नीरव मोदीने भाड्याने ऑफिस घेतले होते. प्राॅपर्टीवर अद्वैत होल्डिंग्स चा मालकी हक्क आहे माझी पत्नी आणि मुलगा हे त्याचे डायरेक्टर आहेत. माझ्या कुटुंबाचा आणि अद्वैत होल्डिंगचा नीरव मोदीशी काही संबंध नाही. प्राॅपर्टीमध्ये भाड्याने ऑफिस घेण्या-या फायर स्टोन ने देखील 2017 मध्येच कमला मिल्सची जागा रिकामी केली होती.
यातून हेच स्पष्ट होते की नीरव मोदीने करोडोंचे कमिशन दिल्याचे व घोटाळ्यात काॅंग्रेस नेत्यांचा वाटा असल्याचा दावा खोटा आहे. सोशल मिडियामध्ये असाच दावा भाजपाच्या नावाने देखील व्हायरल झाला होता तो देखील खोटा असल्याचे आढळून आले आहे. कारण नीरव मोदी ने लंडनच्या कोर्टात किंवा अन्य ठिकाणी अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य केल्याचे वृत्त प्रतिष्ठित वर्तमानपत्रात किंवा टीव्ही चॅनल किंवा वेबसाईटवर आढळून आलेले नाही. मागील वर्षी देखील अशाच खोटा दावा सोशल मिडियात व्हायरल झाला होता.
Tools Used
- Google Keywords Search
- Twitter Advanced Search
Result- False