Tuesday, March 19, 2024
Tuesday, March 19, 2024

HomeFact Checkअर्णब गोस्वामींना पोलिसांनी मिरचीची धुरी दिल्याची बातमी व्हायरल, हे आहे सत्य

अर्णब गोस्वामींना पोलिसांनी मिरचीची धुरी दिल्याची बातमी व्हायरल, हे आहे सत्य

Authors

रिपब्लिक भारत टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना पोलिसांनी उलटे टांगून मिरचीची धुरी दिल्याची बातमी व्हायरल झाली आहे. सनातन प्रभातच्या नावाने व्हायरल झालेल्या या बातमीत म्हटले आहे की, अर्णव गोस्वामींना उलटे टांगून खालून मिरचीची धुरी दिली. हिंदुविरोधी महाराष्ट्र पोलिसांचा कारनामा.

फेसबुक/संग्रहित

Fact Check/Verification

अर्णव गोस्वामींना पोलिसांनी उलटे टांगून मिरचीची धुरी दिल्याच्या बातमीचे सत्य काय आहे याची आम्ही पडताळणी सुरु केली. व्हायरल बातमीचा स्क्रिनशाॅट बारकाईने पाहिला असता त्यावरील तारीख 27 डिसेंबर 2012 ते 2जानेवारी 2013 असल्याचे तसेच मराठी महिन्यानुसार ‘मार्गशीर्ष’ महिन्याचा उल्लेख केला गेला आहे. आम्ही मराठी महिन्यांचा शोध घेतला असता आता अश्विन महिना सुरु असल्याचे आढळून आले.

सनातन प्रभातने अर्णव गोस्वामी यांच्यासंदर्भात अशी प्रसिद्ध केली होती आहे का याविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही सनातनच्या वेबसाईटला भेट दिली. अर्णव गोस्वामी यांच्याविषयी अनेक बातम्या आढळून आल्या, मात्र व्हायरल पोस्टमधील असा मथळा किंवा मजकूर असणारी बातमी आढळून आली नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी अर्णव गोस्वामींना न्यायालयीन कोठडीत मिळत असलेल्या वागणुकीबद्दल उच्च न्यायालयाने नोंद घ्यावी अशी विनंती केल्याची बातमी सनातन प्रभातने प्रकाशित केली आहे. मात्र यात देखील कुठेही मिरची धुरी किंवा उलटे टांगणे याचा उल्लेख नाही.

Conclusion

यावरुन सिद्ध होते की सनातन प्रभातच्या अंकाचा जुना स्क्रिनशाॅट एडिट करुन अर्णव गोस्वामींच्या संदर्भातील खोटी बातमी या नियतकालिकाच्या नावाने व्हायरल करण्यात आली आहे.

Result-False

Our Sources

सनातन प्रभात- https://sanatanprabhat.org/marathi/420476.html

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.


Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular