Thursday, March 28, 2024
Thursday, March 28, 2024

HomeFact Checkपंतप्रधान मोदी मुकेश अंबानींच्या नातवाला पहायला पोहचल्याचा दावा व्हायरल, जाणून घ्या सत्य

पंतप्रधान मोदी मुकेश अंबानींच्या नातवाला पहायला पोहचल्याचा दावा व्हायरल, जाणून घ्या सत्य

Authors

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुकेश अंबानींच्या नातवाला पहायला हाॅस्पिटलमध्ये पोहचल्याचा दावा व्हायरल झाला आहे. नुकताच आकाश आणि श्लोका अंबानी यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. अशातच अंबानी कुटुंबिय आणि काही लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा हाॅस्पिटलमधील फोटो व्हायरल झाला आहे. दावा करण्यात येत आहे की, भोळा भाबडा शेतकरी आज 17 दिवस होतात थंडी पाऊस वारा वादळ कसलाही विचार न करता दिल्ली मध्ये आंदोलन करत आहे मात्र त्याच्याकडे जाण्यास पंतप्रधानांना वेळ नाही आणि अंबानींच्या नातवाला पहायला मात्र लगेच गेले.

फेसबुक/ संग्रहित

Fact Checking/Verification

अंबानी कुटुंब आणि पंतप्रधान मोदी यांच्या व्हायरल फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली. रिव्हर्स इमेच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला 25 आॅक्टोबर 2014 रोजी इंडिया टुडेच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या लेखात व्हायरल फोटो आढळून आला. फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, मुंबईमधील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव, रिलायन्स फाऊंडेशनचे अध्यक्ष नीता अंबानी आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासमवेत.

यावरुन हे स्पष्ट झाले की, हा फोटो आत्ताचा नाही. शिवाय महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणू सी विद्यासागर राव यांनी 2014 ते 2019 पर्यंत कार्यकाळ पूर्ण केला आहे. आता भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल आहेत. अधिक शोध घेतला असता आम्हाला 27 आॅक्टोबर 2014 रोजीचा युट्यूब व्हिडिओ आढळून आला ज्यात व्हायरल फोटोचा समावेश आहे. व्हिडिओच्या वर्णनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयाचे उद्घाटन केले त्यावेळी हा व्हिडिओ आहे. शाहरुख खान, आमिर खान, अमिताभ बच्चन, करीना कपूर इत्यादी चित्रपटसृष्टीतील दिग्गज या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अंबानी कुटुंबाचा फोटो आताचा नाही तर सहा वर्षांपूर्वीचा आहे. हा फोटो चुकीच्या दाव्याने व्हायरल झाला आहे.

Result: False

Our Sources

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular