Saturday, April 20, 2024
Saturday, April 20, 2024

HomeMarathiराहुल गांधींनी दिल्ली निवडणुकीनंतर केजरावालांची भेट घेऊन अभिनंदन केले नाही, जुना फोटो...

राहुल गांधींनी दिल्ली निवडणुकीनंतर केजरावालांची भेट घेऊन अभिनंदन केले नाही, जुना फोटो व्हायरल

Authors

Claim– राहुल गांधी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव होऊन देखील अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या.

Verification
नुकताच दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात आम आदमी पार्टीला पुन्हा एका बहुमत मिळाले. यानंतर सोशल मीडियात अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत राहुल गांधी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन करता दिसत आहेत. व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, दिल्ली विधासभा निवडणुकीत दणकुन पराभव झाला तरी राहुल गांधी यांनी केजरीवाल यांचे अभिनंदन केला. यालाच खरा बंधुभाव म्हणतात.
आम्ही याबाबत पडताळणी सुरु केली. व्हायरल फोटोचा गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला हिंदुस्तान टाईम्स च्या वेबसाईटवर मागील वर्षी प्रकाशित झालेल्या एका बातमीत हा फोटो आढळून आला. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीचा हा फोटो असल्याचे यात म्हटले आहे.
हा फोटो गेट्टी इमेजेस वह देखील आढळून आला. यात दिलेल्या माहितीनुसार हा फोटो 26 जानेवारी 2018 रोजी दिल्लीतील राजष्ट्रपती भवनात रिसेप्शनच्या वेळी  कांग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यममंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट झाली होती.
याबाबत आम्ही अधिक शोध घेतला असता आम्हाला दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 नंतर राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल आणि आम आमदी पार्टीचे अभिनंदन केल्याचे ट्विट आढळून आले.
यावरुन हेच स्पष्ट होते की अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांचा हा फोटो दोन वर्षापूर्वीचा असून त्याचा नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीशी संबंध नाही. सोशल मीडियामध्ये चुकीच्या दाव्याने हा फोटो व्हायरल होत आहे.
Sources
Facebook Search
Twitter Advanced Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular