Claim–
हा आहे अमित शाह यांच्या स्वप्नातील भारत. ते असंच चित्र नाही तर या पेक्षाही भयानक चित्र या देशामध्ये दाखवू इच्छितात.
Verification–
सध्या सोशल मीडियामध्ये एनआरसी आणि सीएएच्या पार्श्वभूमीवर एक फोटो शेअर होतो आहे यात एक टिशर्ट घातलेल्या महिलेला आर्मीचे जवान ओढताना दिसत आहेत. व्हायरल पोस्टमध्ये हा दावा करण्यात येत आहे कि सध्या देशाचे गृहमंत्री यांंची संपूर्ण देशात असंच चित्र निर्माण व्हावं किंबहुना यापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण व्हावी अशीच इच्छा आहे. यापेत्रा भयानक चित्र ते या देशात दाखवू इच्छितात.
सध्या सुधारित नागरिक सुधारणा कायदा आणि नागरिकता नोंदणी कायद्याच्या पार्श्वभूमीवर हा फोटो व्हायरल होत असल्याने आम्ही याबाबत पडताळणी करण्याचे ठरविले असता आम्हाला हा फोटो आसाममधील असल्याचा दावा करणारे ट्विट आढळून आले.
फेसबुकवर देखील हाच दावा करणा-या पोस्ट आढळून आल्या
आम्ही काही किवर्ड्स आधारे या फोटोविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र फोटोसंदर्भात काही माहिती मिळाली नाही. यानंतर आम्ही गूगल रिव्हर्स इमेजच्या आणि टीनआईच्या साहाय्याने याचा शोध घेतला असता हा फोटो
Shutterstock या वेबसाईटवर हा फोटो आढळून आला. या फोटोविषयी माहिती देताना म्हटले आहे की हा फोटो सन 2008 मधील असून काठमांडूमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीसमोर एक तिबेटियन आंदोलनकर्ती महिला आणि पोलिसांमध्ये असा भड़का उडाला। हा फोटो राॅयटर्सच्या फोटोग्राफर दीपा श्रेष्ठा यांनी 24 मार्च 2008 रोजी काढलेला आहे.
याविषयी माहिती देताना म्हटले आहे की- 24 मार्च 2008 रोजी काठमांडू येथे संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीच्या समोर पोलिस अधिका-यासोबत तिबेटी निदर्शकांनी संघर्ष केला. नेपाळ पोलिसांनी नुकत्याच झालेल्या निदर्शनांच्या मालिकेत 250 निदर्शकांना ताब्यात घेतले. पोलिस प्लास्टिक कवच धारण केलेल्या आंदोलनकर्त्यांना लोखंडी मॅश व्हॅन आणि ट्रकमध्ये ओढून ते घेवून नेले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यात काही लोकांना दुखापतही झाल्याचे सांगण्यात येत आहे.
France24 या वेबसाईटवरही ही बातमी त्यावेळी प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीत 38 वर्षीय केसांग डोळकर या तिबेटी निदर्शकाची प्रतिक्रिया घेण्यात आली आहे यात त्याने म्हटले आहे की, “आम्ही आमचा निषेध सुरू ठेवू. चिनी लोकांना तिबेटी मारण्याची परवानगी देऊ नये,”
यावरुन हेच स्पष्ट होते की सोशल मीडियात सध्या एनआरसी आणि सीएबीच्या पार्श्वभूमीवर फोटो आसाम किंवा उत्तर प्रदेशातील लष्कराच्या हिंसक कारवाईचा म्हणून शेअर केला जात आहे तो मुळात 12 वर्षापूर्वीचा नेपाळमधील तिबेटी आंदोलकांचा आहे. त्याचा भारताचाशी संबंध नाही सोशल माडियात हा फोटो खोट्या दाव्याने व्हायरल करण्यात आला आहे.
Tools Used
Google Keywords Search
TinEye
Facebook
Twitter
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)