Thursday, April 25, 2024
Thursday, April 25, 2024

HomeMarathiमहाविकास आघाडी सरकारने शिवथाळीसाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे का? वाचा सत्य

महाविकास आघाडी सरकारने शिवथाळीसाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे का? वाचा सत्य

Authors

Claim

महाविकास आघाडी सरकारच्या शिवथाळी साठी आधार कार्ड सक्तीचे

Verification
महाविकास आघाडी सरकारने गरीबांसाठी राज्यात 10 रुपयांत शिवथाळी योजना सुरू केली असून याचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्याच आल्याच्या पोस्ट्स सध्या सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. आम्ही याबाबत पडताळणी करण्याचे ठरविले असता फेसबुकवर अनेक दावे आढळून आले.
याशिवाय वेबदुनिया मराठीच्या फेसबुक पेजवर देखील ही बातमी प्रसारित करण्यात आली आहे.
याबाबत आम्ही पडताळणी सुरु ठेवली असता आम्हाला अनेक माध्यमांमध्ये ही बातमी आढळून आली यात म्हटले आहे की शिवथाळी साठा आधारकार्ड सक्तीचे आहे.
आम्ही शोध सुरुच ठेवला असता आम्हाला महाराष्ट्र टाईम्समध्ये छापून आलेली बातमी मिळाली यात म्हटले आहे की, २६ जानेवारी रोजी सुरु होणारे ‘शिवभोजन’ हे गरीब व गरजू व्यक्तीसाठी आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. शिवभोजन केंद्रावर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन शिवभोजन योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
याशिवाय आम्हाला या शिवभोजन थाळीच्या अटी आणि शर्थींवर नीलेश राणे यांनी टिका केल्याची बातमी आढळली या बातमीत अटी व शर्थीमध्ये आधारकार्डचा उल्लेख नाही. 
याशिवाय आम्हाला लोकसत्ताच्या वेबसाईटवर शिवथाळीसाठी आधारकार्ड सक्तीची अफवा असल्याची बातमी आढळून आली. या बातमीत म्हटले आहे की काही प्रसारमाध्यमांनी आधारकार्ड सक्तीची बातमी दिली होती मात्र ही अफवा असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की महाविकासआघाडी सरकारने गोरगरीब लोकांसाठी सुरु केलेल्या शिवभोजन थाळी साठी आधारकार्ची सक्ती असणार नाही. माध्यमांत आणि सोशल मीडियात चुकीच्या बातम्या तसेच पोस्ट व्हायरल झाल्या.
Tools Used
  • Facebook 
  • Google Search 
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular