Friday, March 29, 2024
Friday, March 29, 2024

HomeMarathiनीता अंबानींनी सीएबी2019 चे समर्थनार्थ ट्विट केल्याने लोक जिओचे सिम वापरणे बंद...

नीता अंबानींनी सीएबी2019 चे समर्थनार्थ ट्विट केल्याने लोक जिओचे सिम वापरणे बंद करु लागले ? काय आहे सत्य

Authors

Claim

नीता अंबानींनी सीएबी2019 चे समर्थनार्थ ट्विट केल्याने लोक जिओचे सिम वापरणे बंद करु लागले आहेत. तुम्ही कधी पोर्ट करत आहात. एका चुकीमुळे कंपनीची वाताहत सुरु लागली. 

Verification
Veer Deshbhakti नावाच्या ट्विटर हॅंडलवरुन नीता एक आॅडिओ क्लिप शेअर करण्यात आली आहे. यात एक मुस्लिम व्यक्ति जिओ च्या काॅल सेंटरवर काॅल करुन नीता अंबानी यांनी सीएबी 2019 चे समर्थ केल्यामुळे आपण जिओ ची सेवा बंद करून दुस-या कंपनीची सेवा घेत असल्याचे काॅल सेंटरमधील प्रतिनिधीस सांगत आहे.  ट्विटमध्ये दावा करण्यात आला आहे की नीता अंबानीनी घेतलेल्या भुमिकेमुळे लोक जिओचे नंबर पोर्ट करु लागले आहेत. एक चुक कंपनीच्या वाताहतीस जबाबदार आहे. आम्हाला हाच दावा असणारे आणखी एक ट्विट मिळाले.
नीता अंबानी यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटले आहे याबाबत आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. गूगल मध्ये काही किवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता नीता अंबानी यांच्या नावाने कुणीतरी फेक अकाउंट उघडल्याने खळबळ माजल्याची बातमी दैनिक सकाळमध्ये आढळून आली.
या बातमीत म्हटले आहे की नीता अंबानींच्या फेक टविट्सचे काही स्क्रिनशाॅट्स शेअर करण्यात आले आहेत. हे ट्विट्स व्हायरल झाल्यानंतर जिओ इन्फोकाॅम ने ट्विटरला हे फेक अकाउंट डिलीट करण्याची विनंती केली आहे तसेच जिओ कडून नीता अंबानीचे कोणतेही ट्विटर अकाऊंट नसल्याचे सांगण्यात आले आहे.
जिओ इन्फोकाॅच्या वतीने केलेल्या विनंतीवरुन ट्विटरने ते फेक अकाउंट हटवल्याची बातमी न्यूज 18 हिंदीने प्रसिद्ध केली होती.
याशिवाय आम्हाला कुठेहीही नीता अंबानींच्या फेक ट्विटमुळे लोक जिओ सिम वापरणे बंद करु लागल्याची बातमी आढळून आली नाही. त्या मुळे ट्विटमध्ये करण्यात आलेला दावा हा भ्रामक असल्याचे स्पष्ट झाले.
Tools Used 
Google Search
Twitter Advanced Search
Result- False 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular