"पंतप्रधान मोदी हे स्वतः पदवीधर नसल्याने त्यांचा फोटो प्रचारात न वापरण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, ज्याचा फटका आम्हाला या निवडणुकीत बसला" असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
म्हादाईचे पाणी या विषयावर गोव्यातील विरोधी पक्षांनी गोवा मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या वादावर एकीकडे १३ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दुसरीकडे म्हादाईच्या मुद्द्यावर अमित शहांच्या टिप्पणीवर गोव्याचा विरोध आणि स्थानिकांचा संताप वाढत चालला आहे. २८ जानेवारीला उत्तर कर्नाटकातील एका रॅलीत बोलताना शाह म्हणाले, " मित्रांनो, कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांमधील असा जुना वाद मिटवून म्हादाई चे पाणी कर्नाटकला देऊन भारतीय जनता पक्षाने कर्नाटकातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे काम केले आहे." भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील दोन सरकारांमध्ये एकमत झाले आहे, असा शहा यांच्या विधानाचा अर्थ आहे.
गेल्या आठवडाभरात सोशल मीडियावर अनेक व्हायरल दाव्यानी धुमाकूळ घातला. अभिनेता रणवीर कपूर ने आपल्या चाहत्याचा फोन फेकून दिला असा एक दावा व्हायरल झाला. युपी मध्ये हिंदुत्ववादी गुंडांनी दलित मुलीला क्रूरपणे मारल्याचा दावा एका व्हायरल व्हिडीओ च्या माध्यमातून करण्यात आला. एका बनावट वेबसाईटची लिंक देऊन ती उद्यम नोंदणीसाठी अधिकृत वेबसाईट असल्याचा दावा करण्यात आला होता. तर मुंबईत झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाला मुस्लिमांनी अडथळा आणल्याचा आरोप करणारा एक दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.
सोशल मीडियावरील एका व्हिडिओच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, मुस्लिमांनी महाराष्ट्रात हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, "मुंबईत झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चा वर खुश होवून झोपू नका. जरा हा कोपरा बघा… तुम्हाला भविष्यातील आव्हानाची कल्पना येईल." या कॅप्शनखाली हा दावा करण्यात येत आहे.